WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भरतीच्या सराव काळात शासकीय मैदान 10 दिवस बुक.....

Image

सुरज चाटे वणी:- भरतीच्या चाचणी करिता सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचा झाला खोळंबा....

नवरात्री उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपले असून, येत्या नवरात्रीमध्ये दांडीयासाठी शासकीय मैदान एका संस्थेला देण्यात आल्याने खेळाडू आणि क्रीडाप्रेमीं आपले रोजचे प्रशिक्षण कुठे घेणार यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली पोलीस भरती जर विद्यार्थ्यांची 10 दिवस सराव झाला नाही तर त्यांचे भरती दरम्यान मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे 10 दिवस मैदान व्यस्त असल्याने आता सराव करायचा तरी कसा हाच प्रश्न मैदानातील विध्यार्थ्यांना व प्रशिक्षकांना पडला असून, मैदानावर फेरफटका मारला असता कार्यक्रमाकरिता परवानगी मिळाल्याच्या चर्चा विद्यार्थ्यांत दिसून आल्या.

काही दिवसांवर येऊन ठेपलेला नवरात्री उत्सवासाठी शासकीय मैदानाची जागा बुक करण्यात आली असून मात्र यामुळे 10 दिवस चालणार असलेल्या कार्यक्रमामुळे याठिकाणी 10 दिवसांचा युवक युवतीचा सराव होणार नसल्याने त्यांच्या काही दिवसांवर पोलीस भरती आदी भरती येऊन ठेपली असून त्यामुळे त्यांच्या सरावास अडथळा निर्माण होत असून यामुळे त्यांना भरती काळात याचे मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते, अनेक वर्षांपासून वणीत नवरात्री दरम्यान दांडीयाचा कार्यक्रम चालतो. या कार्यक्रमासाठी तिकीट देखील असते. हा कार्यक्रम दर वेळी खासगी ठिकाणी व्हायचा. मात्र यावेळी या दांडीयाला शासकीय मैदानावर परवानगी दिल्याने या मैदानावरील रोज सराव करणारे खेळाडु व क्रीडाप्रेमी यांच्यावर 10 दिवसाच्या सरावाचे संकट दिसून येत असून युवकांचे याला विरोध सुद्धा दिसून येत आहे असे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. या कार्यक्रमामुळे नऊ दिवस मैदानावरील सर्व कृती बंद होणार असल्याने या प्रकाराने क्रीडाप्रेमी, खेळाडू, योगाप्रेमी, तसेच फिरण्यासाठी जाणारे सर्वसामान्य नागरिक संतप्त झाले आहेत.

वणीमध्ये सध्या एकच योग्य परिस्थितीतील शासकीय मैदान आहे. या मैदानावर क्रिकेट, व्हॉलिबॉल, फुटबॉल, ऍथलॅटिक, योगा इत्यादी खेळ प्रकार चालतात. शिवाय यात सकाळी आणि संध्याकाळी फिरण्या-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच अनेक सार्वजनिक कार्यक्रम, मूर्त्यांची विक्री, विविध सण इत्यादी गोष्टींसाठी या मैदानाची परवानगी देण्यात येते. दरम्यान यामुळे दोन ते तीन दिवस मैदानावरील खेळ, सराव सर्व बंद होतात. त्यातच आता तब्बल नऊ दिवसांची परवानगी देण्यात आल्याने या सर्व खेळाविषयी काय होणार व सराव काऱयांचे काय होणार? हाच प्रश्न उपस्थित होत असून, त्यामुळे क्रीडाप्रेमी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. आधीच परिसरात कोणत्याही खेळाला प्रोत्साहन मिळत नाही. खेळाडुंना योग्य त्या सोयीसुविधा दिल्या जात नाही. तसेच गेल्या काही काळापासून तालुका क्रीडा अधिकारी नसल्याने परिसरातील क्रीडा प्रकाराचा ‘खेळ’ झाला आहे. खेळाडू स्वःखर्चाने तसेच आपसात वर्गणी गोळा करून इथे विविध खेळांचा सराव करतात. सोबतच इथे पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठीची शारीरिक तंदरुस्तीसाठी सराव करणा-यांची संख्या मोठी आहे. एका खासगी संस्थेला नवरात्री दरम्यान दांडीया उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली. हा कार्यक्रम संपूर्णतः व्यावसायिक आहे. यासाठी तिकीट दरही आकारले जाते. यामुळे तब्बल नऊ ते दहा दिवस खेळाचा सराव करणे, फिरणे, योगा, इत्यादी गोष्टींमध्ये व्यत्यय येणार आहे. अजून पर्यंत यांवर शिक्का मोर्तब झाला नसून मात्र 10 दिवसाच्या या कार्यक्रमांमुळे क्रीडा प्रेमी व सराव करणारे विद्यार्थी हे मात्र नाराज दिसून येत आहे, यासाठी सराव खंडित झाल्यास विध्यार्थ्यांचे मोठे नुकसान हाऊ शकते त्यामुळे सराव होणे गरजेचे आहे, परंतु यात नेमके काय होणार हे मात्र चर्चेचा विषय असून खमंग चर्चेला उत आला असून शिक्का मोर्तब काय होणार याकडे विद्यार्थ्याचे व प्रशिक्षणार्थयांचे लक्ष लागले आहे. मैदानावर फेरफटका मारला असता कार्यक्रमाकरिता परवानगी मिळाल्याच्या चर्चा विद्यार्थ्यांत दिसून आल्या.

तालुका प्रशिक्षण केंद्रांची दयनीय अवस्था.....

गेल्या अनेक वर्षापासुन तालुका प्रशिक्षण केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे, याचा निधी नेमका गेला कुठं? हाच प्रश्न निर्माण झाला असून लाखो रुपये मंजूर होऊन काम मात्र आर्ध्यावरच दिसून येत आहे, या संदर्भात पत्र व्यवहार करन्यात आला आहे, त्यामुळे वणी ही खळाडू व कलाकारांची नगरी असून याठिकाणी पाहिजे तसा प्रतिसाद संबंधितांकडून दिसून येत नसून पाणी कुठे मुरत आहे? हा प्रश्न येथील प्रशिक्षकासहित विद्यार्थ्याना पडला आहे.

विद्यार्थ्यांच्या सरावात खंड पडता कामा नये... प्रशिक्षक मालेकार सर..

विद्यार्थाना रोजच्या सरावाची मोठी गरज असून खंड पडल्यास भरतीचे वेळी त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेली भरती प्रक्रिया पाहता 10 दिवसांचा सराव खंडित होणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भरतीवर परिणाम हाऊ शकतो त्यामुळे त्यांच्या सरावात खंड पडता कामा नये असे प्रा दिलीप मालेकार सर यांनी दैनिक देशोन्नती शी बोलताना सांगितले.

प्राधान्य कोणाला देणार? ....
एकीकडे आपल्या आयुष्याला घडविण्याकरिता जिद्द, चिकाटी, धैर्य निर्माण करून प्रयत्नात लागलेल। विद्यार्थी सराव करीत असून दुसरीकडे वर्षातून एकदा येणारे 10 दिवस नवरात्रचे कार्यक्रम त्यामुळे प्राधान्य कोणाला देणार? असाच प्रश्न याठिकाणी जनमानसात निर्माण होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share