WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक, पुण्याजवळ टँकर पकडला

Image

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या 3 मे पर्यंत देशभरात लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. लोकांची जीवानावश्यक वस्तूंसाठी मारमार सुरू आहे. मात्र एकीकडे देशासह राज्यात गंभीर परिस्थिती असताना पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात चक्क एका दुधाच्या टॅँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असताना हा टँकर पोलिसांनी कात्रज भागात पकडला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्रच खळबळ उडाली आहे.

भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी काल रात्री कात्रज परिसरात टेम्पोतील २९ हजार रुपयांचे बिअरचे १२ बॉक्स पकडले आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालकाला ताब्यात घेत टेम्पो जप्त करून भारती विद्यापीठ पोलिसांकडे देण्यात आला आहे.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा जसे दूध, भाजीपाला, किराणा वस्तू आणि मेडिकल सेवा सुरू असून त्यांना पोलिसांकडून पास देण्यात आले आहेत. तर जागोजागी पोलिसांची गस्त देखील सुरू आहे. काल रात्री भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कात्रज घाट परीसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार पारखी, तोंडे यांच्यासह पोलीस नाईक भिंगारे यांना एक दुधाचा टेम्पो संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबविले. चालकाकडे चौकशी केली असता तो खोट बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दुधाच्या कॅरेटच्या पाठीमागे ठेवलेले २९ हजार रुपयांचे १२ बिअर बॉक्स सापडले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.