WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महापरिनिर्वाण दिना निमित्त असंख्य अनुयायांनी वाहिली महामानवाला आदरांजली

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ त्यांना अभिवादन करण्याकरिता असंख्य अनुयायी एकत्र आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात उपस्थित अनुयायांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. तसेच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्रिशरण पंचशील धम्मपूजा घेण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व विद्यमान रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबरच परिसरातील अनुयायांनीही उपस्थिती दर्शविली होती.

बाल वयापासूनच विषमतेची झळ सोसणाऱ्या बाबासाहेबांनी आपला समाज विषमतेच्या आगीत होरपळु नये म्हणून विषारी विषमताच जाळून टाकली. सर्वाना कायद्याच्या चौकटीत आणून सामान अधिकार व सामान वाटा उपलब्ध करून दिल्या. आपलं संपूर्ण आयुष्य दलित, शोषित व बहुजन समाजाच्या उत्थानाकरिता वाहून घेतलं. गुलामीच्या जोखळातून मुक्त करून माणसाला माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य मिळवून दिलं. स्त्रियांना स्वतंत्र हक्क बहाल केले. शिक्षणाच्या वाटा उपलब्ध करून दिल्या. मागास्वर्गीयांकरिता आरक्षणाची तरतूद केली. देश व समजाच्या उन्नतीत मोलाचे योगदान देणाऱ्या बाबासाहेबांचे वृनं फेडणे शक्य नसले तरी विषमतेची पाळेमुळे खणून सामाजिक सलोखा टिकून राहील ही संकल्पना अंगी कारल्यास बाबासाहेबांचं एकात्मता नांदण्याचं स्वप्न पूर्णत्वास येईल व हीच या महामानवाला खरी श्रद्धांजली ठरेल. हे विचार याठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले. बहुजन समाजाला न्याय व हक्क मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी असंख्य अनुयायांनी आदरांजली वाहिली. त्यांना अभिवादन करण्याकरिता पंचशील झेंड्याजवळ अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.