WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नारंडा येथे वनतालावाची निर्मिती

Image

भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या प्रयत्नांना यश
★★★★★★★★★★★★★★★★★★
गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतालावाची निर्मिती झाली असून याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी आमदार अँड.संजय धोटे यांच्या माध्यमातून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर यांचेकडे पाठपुरवठा करून सदर मागणी मंजुर केली होती.
नारंडा या गावाचा सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियान योजनेत समावेश झाला होता,नारंडा येथे दोन तलाव असून त्यापैकी एका तलावाचे खोलीकरण झाले आहे.नारंडा येथे वनविभागाची जवळपास २५० हेक्टर जागा असून त्यापैकी काही जागेवर वनतालाव निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. नारंडा येथे बहुतांश भाग हा पठारी असून पावसाळ्यात सदर पाणी हे पिपरी रस्त्याने शेतकऱ्यांच्या शिवारात जात असे त्यामुळे त्यांचे नुकसान होत असे जर सदर भागात वनतालाव निर्माण झाल्यास पठारी भागातील पावसाळ्यात पाणी हे वनतलावात साठणार होते व शेतातील होणारे नुकसान टळणार होते सदर बाब लक्षात घेऊन भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी वनतलावाच्या निर्मिती साठी प्रयत्न केले,त्यानंतर सदर वनतालावाची प्रशासकीय मंजुरी झाली व वनतालावाची निर्मिती करण्यात आली.
त्यानंतरच्या पावसात वनतलावात पाणी साचले असून शेतशिवारातील व गावातील पाण्याची पातळी वाढण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.