WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जेष्ठ वकील उज्वल निकम यांचा पोलिस एन्काऊटरवर संशय

Image

ज्या पद्धतीने अरोपींंना ठार करण्यात आले ती पद्धत योग्य नाही. बारामती- हैदराबाद आरोपीला तपसाकरीता घेउन जात होते. संसरक्षणासाठी एन्काऊटर केला असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. परंतु सकृतदर्शनी स्वसंरक्षणासाठी असे काही वाटत नाही. असे जेष्ठ अॅड. उज्वल निकम म्हणाले. एन्काऊटर ही भूमिका पोलिसांची संशयास्पद असल्याचेही ते म्हणतात. आरोपी पळून जात असताना दगड फेक केल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी केला. तपासासाठी चारही आरोपीच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते. दगड फेकिने जीव खरच धोक्यात येतो का? गंभीर गुन्ह्यातील आरोपींना घेउन जाताना त्यांच्या हातात बेडया असायला पाहिजे आणि पोलिस बंदोबस्त हवा पण असे काही दिसत नाही. एकालाही बेडी नाही. चार-पाच पोलिस नाही अशी पद्धत नसते. आरोपी पळून जाऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. देशभरात या शिक्षाने जनता खुष आहे. पण अशा प्रकारची शिक्षा जर पोलिस द्यायला लागले तर जनतेचा कायद्यावरचा विस्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल. पोलिसांचे काम अटक करण्याचे आहे. न्यायालय न्याय देण्याचे काम करेल. पोलिसांना मात्र, कायदा हातात घ्यायचा अधिकार नाही. ज्या पद्धतीने अरोपीना ठार करण्यात आले ती पद्धत योग्य नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR