WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दिल्ली हिंसाचार: ६० वर्षीय व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू; मृतांचा आकडा ४२ वर

Image

उत्तरपूर्व दिल्लीतील शिव विहार परिसरात शुक्रवारी एका ६० वर्षीय व्यापाऱ्याचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. यापूर्वी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मृत व्यक्तीचं आयुब अंसारी असं असून ते गाजियाबादमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली. “काही अज्ञात व्यक्ती माझ्या वडिलांना घेऊन घरी आले. त्यावेळी ते जखमी होती. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास त्यांना जवळच्या स्थानिक दवाखान्यात नेण्यात आलं. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जीटीबी रूग्णालयात हलवण्यात येत होतं. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला,” अशी माहिती त्यांचा मुलगा सलमान यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

“मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू होता त्यामुळे माझे वडिल गेल्या काही दिवसांपासून घरातच होते. परंतु सकाळी चार पाचच्या सुमारात भंगार गोळा करण्यासाठी निघाले. काही अज्ञात व्यक्ती त्यांना घरी घेऊन आल्या तेव्हा मला जाग आली. वडिलांच्या डोक्याला, शरीरावर आणि पायांवर जखमा होत्या. त्यावेळी ते शुद्धीत होते आणि काही लोकांनी आपल्याला शिव विहार परिसरात थांबवून नाव विचारल्याचं सांगितलं. जेव्हा त्यांनी उत्तर दिलं त्यावेळी त्या लोकांनी त्यांना मारहाण केली,” अशी माहितीही त्यांनी दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.