WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाहतूक पोलिसांनी रिक्षावाल्यांसमोरच केली शेकडो हेडफोन्सची होळी

Image

कानामध्ये हेडफोन्स घालून गाडी चालवणे धोकादायक ठरु शकते. अनेकदा गाडी चालवताना गाणी ऐकत असताना आजूबाजूच्या गोष्टींचा अंदाज घेणे कठीण होतं अन् अपघात होण्याची शक्यता असते. हेडफोन्स घालून गाड्या चालवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र भारतामध्ये हेडफोन्स घालून भरधाव वेगाने गाड्या चालवणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. अगदी दुचाकी, चारचाकी असो किंवा रिक्षा अनेक चालक कानामध्ये हेडफोन्स टाकून गाड्या चालवताना दिसतात. मात्र मीरा रोडमधील रिक्षा चालकांना अशाप्रकारे हेडफोन्स घालून रिक्षा चालवणे जास्तच महागात पडले आहे. येथील पोलिसांनी हेडफोन्स घालून गाड्या चालवणाऱ्या रिक्षावाल्यांचे हेडफोन्स जप्त करुन ते जाळले आहेत.

मीरा रोडमधील वाहतूक पोलिसांनी हेडफोन्स घालून रिक्षा चालवणाऱ्यांविरोधात मागील काही दिवसांपासून एक मोहीम राबवली होती. हेडफोन्स घालून रिक्षा चालवणाऱ्यांना दंड करुन त्यांचे हेडफोन्स जप्त करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. काही दिवसांमध्ये पोलिसांकडे अनेक हेडफोन्स गोळा झाले. रिक्षावाल्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी नंतर या सर्व हेडफोन्सची रिक्षावाल्यांसमोरच होळी केली. वाहन चालवताना हेडफोन्स घालू नका असे अनेकदा प्रबोधन करुन झाल्यानंतरही रिक्षावाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनेकदा सांगूनही रिक्षावाले ऐकत नसल्याने थेट हेडफोन्स जप्त करुन त्यांची होळी करण्याचा निर्णय पोलिसांना नाइलाजास्तव घ्यावा लागला.

पोलिसांनी राबवलेल्या या हेडफोन्सविरोधी मोहिमेचा व्हिडिओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस हेडफोन्स घालून रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करताना दिसत आहेत. त्यानंतर गोळा केलेले हेडफोन्स पोलिसांनी जाळून टाकल्याचेही व्हिडिओच्या शेवटी दिसते. अर्थात याने वायू प्रदुषण झालं असलं तरी रिक्षाचालकांविरोधात कायदा समजवून सांगण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.