WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भाजपयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात निराधार लाभार्थ्यांचा तहसील कार्यालयावर धडक

Image

कोरपना तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्त्यांना नियमित मानधन मिळावे याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्त्वात तालुक्यातील शेकडो लाभार्त्यांनी तहसील कार्यालय कोरपना येथे धडक देऊन तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांना निवेदन दिले.

कोरपना तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे ५ हजार पाचशे लाभार्थी असून सदर लाभार्त्यांचे मानधन नियमित मिळत नाही दर ३-४ महिन्यांनी त्यांचे मानधन हे बँकेच्या खात्यात जमा करतात परंतु बँकेत जमा झाल्यावरसुद्धा बँकेचे अधिकारी लाभार्त्यांच्या खात्यात मानधन वर्ग करायला १ महिना लावतात त्यामुळे निराधार योजनेचे लाभार्थी नियमित मानधानापासून वंचित राहत आहेत.

तसेच बँकेत जेव्हा लाभार्थी मानधानासंदर्भात चौकशी करतात तेव्हा सुद्धा त्यांना बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही,तसेच त्यांना पैसे काढून देण्यासाठी टाळाटाळ करीत असतात.

तसेच तहसील कार्यालयातर्फे यापुढे लाभार्त्यांच्या खात्यात नियमित मानधान जमा केल्या जाईल व जे कोणी बँक कर्मचारी लाभार्त्यांशी सन्मानजनक वागणूक देणार नाही जर तशी लाभार्त्यांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असे आश्वासन तहसील महेंद्र वाकलेकर यांनी भाजपयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने व निराधार लाभार्त्यांशी चर्चा करताना दिले.

कोरपना तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे ३०० प्रलंबित प्रकरणे मंजूर केल्याचीसुद्धा माहिती तहसीलदार यांनी दिली. यावेळी कोरपना तालुक्यातील शेकडो संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी तहसील कार्यालय येथे उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.