WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नागपुरातील बेघरांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; तुकाराम मुंढेंनी सुरु केला उपक्रम

Image

लॉकडाउनच्या काळात सर्वत्र रोजगार ठप्प झाला आहे. या काळात गरिबांचे आणि बेघर लोकांचे मोठे हाल होत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे विशेष कौशल्य नसल्याने एरव्ही देखील ते रोजगारापासून वंचित असतात. ही अडचण लक्षात घेता सध्याच्या लॉकडाउनमुळे उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्याची एक कल्पना नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना सुचली आहे. त्यानुसार, नागपूर महापालिकेच्यावतीनं शहरातील गरीब आणि बेघर लोकांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

या योजनेबाबत माहिती देताना आयुक्त मुंढे म्हणाले, “लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर आम्ही रस्त्यावरील बेघर आणि भिकारी लोकांना शेल्टर होम्समध्ये दाखल केलं आहे. या ठिकाणी त्यांच्या जेवणा-खाण्याची सोय करण्यात आली आहे. तसंच आरोग्य तपासणी आणि इतर सुविधाही त्यांना इथे देण्यात येत आहेत. आता त्यांच्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमही आम्ही सुरु केला आहे. नागपूर शहर भिकारी निर्मुलन करण्याचे दीर्घकालिन ध्येय डोळ्यासमोर हा कार्यक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. यासाठी रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवले जाणार आहे.

पूर्णपणे त्यांचं रुपडंच पालटून टाकलं

नागपूर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी म्हणाले, “सध्या नागपूरमध्ये १९ शेल्टर होम्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये १५०० ते २००० लोक राहतात. इथं त्यांना दैनंदिन गरजा पुरवण्याबरोबरच आम्ही पूर्णपणे त्यांचं रुपडंही पालटून टाकलं आहे. आता त्यांना आम्ही कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देत आहोत. यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर ते स्वतः कमाऊ शकतील आणि आपलं पोट भरतील.”

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.