WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोठा दिलासा! आजपासून सर्व दुकाने उघडणार; शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स बंदच राहणार

Image

केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविलेला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार होत्या. मात्र, आजपासून सर्वच दुकाने काही अटींवर उघडता येणार आहेत. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत. 


केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही कंपन्यांना कमी स्टाफद्वारे काम करण्याची संमती दिली होती. तसेच दुरुस्ती करणाऱ्या लोकांनाही काम करण्याची परवानगी मिळाली होती. आता अन्य दुकानांना परवानगी काही अटींवर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


या आदेशामध्ये शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी देण्यात आलेली नाही. देशात उद्यापासून काही व्यापारी व्यवहार होण्यास सुरुवात होऊ शकते. निवासी कॉलनीच्या जवळील दुकाने आणि स्टँड अलोन दुकाने आजपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ही दुकाने नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रामध्ये असली पाहिजेत. याशिवाय गृह मंत्रालयलाने काही अटीही लागू केल्या आहेत. 

हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन वगळले
कोरोनामुळे प्रभावित असलेले भाग या सूटमधून वगळण्यात आले आहेत. हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन मधील दुकाने बंदच राहणार आहेत. तसेच शहरी सीमेच्या बाहेर येणाऱ्या दुकानांनाच परवानगी आहे. तसेच बाजार, कपड्यांची दालने जिथे ग्राहक स्वत: फिरतात ती किंवा तशा प्रकारची इतर दुकाने बंद राहणार आहेत.


या अटींनुसार सर्व दुकाने संबंधित राज्य, केंद्र शासित प्रदेशांना प्रदेशांच्या स्थापना कायद्यानुसार नोंदणीकृत असायला हवीत. तसेच या दुकानांमध्ये निम्मे कामगार काम करू शकणार आहेत. त्यांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आदेशात म्हटले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.