WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

घोन्सा येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण ३९ झाले

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे लोन पसरायला लागले असून तालुक्यातील राजूर (कॉलरी) व चिखलगाव नंतर घोन्सा येथेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. घोन्सा येथील एका महिलेचा आज कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ३९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ झाली आहे. २३ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली असून एका कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज ३४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ३३ निगेटिव्ह तर घोन्सा येथील एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांनाच ग्रामीण भागातही कोरोनाचं जाळं पसरताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाची चिंताही वाढली असून उपाययोजना करतांना आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ होतांना दिसत आहे. ग्रामीण भागात कोरोना चोर पावलाने दाखल होतांना दिसत असून आता पर्यंत राजूर (कॉलरी) येथे दोन, चिखलगाव येथे एक तर आज घोन्सा येथे एक कोरोना बाधित महिला आढळून आली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढून ३९ वर पोहचला आहे. यापैकी २३ रुग्ण पूर्णतः बरे झाले असून एक महिला दगावल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण १५ झाले आहेत. १२ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती आहेत तर ३ रुग्ण यवतमाळ येथे उपचार घेत आहे. आज ३४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले त्यात एक महिला पॉझिटिव्ह तर ३३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ५८ नमुने तपासणी करीता पाठविण्यात आल्याने एकूण १७७ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन हरसंभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.