WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लाठी गावात संत श्री नारायण महाराज यांचा पुण्यतिथी पालखी सोहळा संपन्न

Image

सागर मुने, वणी

लाठी येथे दिनांक 25 डिसेंबर 2019 ला संत श्री नारायण महाराज यांचा पालखी सोहळा सपन्न झाला. या अद्वितीय व भव्यदिव्य आशा आयोजनार्थ समस्त गावकऱ्यांनी आहोरात्र परिश्रम केले. नारायण महाराज यांचा संबंध लाठी या गावाशी अतिशय जवळचा स्नेहाचा व मार्गदर्शकाचा होता. एकंदर महाराजांच्या जीवनचरित्रावर दृष्टिक्षेप टाकला असता असे लक्षात येते की नारायण महाराज हे एका ठिकाणी कुठेही राहत नसे त्यांचा संचार सर्वत्र राहायचं त्यांचा संबंध लाठी या गावशी आला त्यांचे अनेकदा वास्तव्य लाठी गावात राहल्याने लाठी गावातील गावकऱ्यामध्ये व नारायण महाराज मध्ये स्नेह संबंध राहला आहे.त्यांचातील असामन्यत्वाचा प्रत्येय वेळोवळी लाठी गावातील नागरिकांना आला त्यामुळे महाराजांविषयी नागरिकामध्ये आदराचे स्थान निर्माण झाले.

त्यामुळे गावकऱ्यांचा मानस होता की संत श्री नारायण बाबा यांचा पालखी सोहळा आयोजित करावा त्याकरिता गावातील गावकऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून सोहळ्याचे आयोजन केले होते.त्यामध्ये सकाळी 9 वाजता घटस्थापना,10 वाजता रांगोळी स्पर्धा 11 वाजता पालखी सोहळा,1.30 वाजता दही हंडी कार्यक्रम आणि सायंकाळी 4 वाजता गावभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

हा संपूर्ण सोहळा आनंदात व उत्साहात पार पडला यात विविध गावातील भजन मंडळे स्वयंस्फूर्ती ने सहभागी होती सोबत शेजारील गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

या पालखी सोहळ्यामुळे गावात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले व गावात एकोप्याची भावना निर्मान झाली. यापुढे हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा मानस या प्रसंगी गावातील सर्व नागरिकांनी बोलून दाखवला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.