WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ओल्या कापसाला लागली आग .....खरं की खोटं

Image

- प्रतिनिधी सागर मुने, वणी

शहरा लगत निळापूर रस्त्यावर अहफाज कॉटन प्रोसेस जिनिंग मध्ये गुरुवारी दुपारी आग लागून साधारणपणे 15 लाख रुपयेचा कापूस जळल्याची घटना घडली. अशी माहिती अहफाज जीनिगच्या मालकाने आरिफ अब्दुल कादर यांनी दिली.

या जिनिंग मध्ये खुल्या जागेवर टॅक्टर च्या मदतीने कापसाच्या गँजी मारण्याचे काम सुरू होते. टॅक्टर ला असलेले ब्लेड आणि सिमेंट फ्लोरिंगच्या घर्षणाने ठिणगी निघाली व कापसाच्या गँजीला आग लागली व 15 लाखाचे नुकसान झाले असे म्हणणे जिनिंग मालकाचे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नुकसान खूप कमी झाले आहे अशी माहिती मिळाली, त्यामुळे पोलिसांना माहिती विचारली असता त्यांनी चौकशी केली व फक्त 75 हजार रुपयांचा कापूस जळाला अशी माहिती पोलिसांनी दिली.

जिनिंग मालक म्हणतात 15 लाख व पोलीस म्हणतात 75 हजार, कोण खर बोलत आहे व कोण खोटं बोलत आहे याचा संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या शहरात सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, याच जिनिंगला वारंवार आग कशी काय लागते, यापूर्वी ही आग लागली होती व इन्शुरन्स कंपनी कडून नुकसानभरपाई मिळाल्याची माहिती आहे.

बुधवारी सायंकाळी 6 वाजता गारपीटा सह जोरदार पाऊस झाला व गुरुवारी पहाटे 5 वाजता पुन्हा पाऊस आला होता. प्रश्न निर्माण असा होतो की इतका जोरदार पाऊस झाला तरीही कापसाला आग लागली कशी, म्हणून खर की खोटं हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या घटनेत शासनाची व इन्शुरन्स कंपनीची दिशाभूल करून लाखो रुपयांचा चुना लावण्याच काम होऊ शकते. त्यामुळे वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांनी सखोल चौकशी केली तर यापूर्वी ही लागलेल्या आगेची घटना व त्यातील झालेला भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो. वणी पोलीस काय करतील या कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.