WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कैलास अग्रवाल सहित तीन कोळसा माफियां अजूनही फरार ?

Image

कोळसा चोरी प्रकरण :-

महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन संशयाच्या घेऱ्यात ?

चंद्रपूर प्रतिनिधी :–

चंद्रपूर तालुक्यातील नागाडा कोळसा टालवर पकडलेल्या २४ ट्रकांची सुरक्षा पोलिसांच्या हाती असून या प्रकऱणामधे कोळसा माफिया कैलास अग्रवाल सह इतर दोन आरोपी अजूनही फरार आहे.मात्र पोलिसांना दिवसरात्र ह्या कोळसा ट्रकांची सुरक्षा करण्यास लावून जो वेळ घालवला आहे व आरोपींना वेळ मिळत आहे त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करणे आवशक झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहातिल सर्वात मोठे कोळसा चोरी रैकेट महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून कोळसा माफिया मागील अनेक वर्षांपासून चालवीत असून अखेर हे कोळसा चोरी रैकेट पोलिसांनी उघड करून देशाच्या संपत्तीची चोरी करणाऱ्या कोळसा माफियांवर गुन्हे दाखल केले आहे. परंतु या प्रकऱणामधे महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक व अधिकारी गुंतले असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआय द्वारे करण्याची मागणी आता जोर पकडू लागली आहे, महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन ही कंपनी खरं तर शासनाची फसवणूक करीत असून वेकोलिप्रशासनाला सुद्धा मूर्ख बनवित आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील वेकोली कोळसा खाणीतून सबसिडीचा कोळसा बंद झालेल्या विविध कंपन्याच्या नावावर उचल करायचा आणि तो कोळसा माफियांच्या माध्यमांतून खुल्या मार्केट मधे विकून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा हा धंदा गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी खोलात जावून तपास करणे आवश्यक आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.